
सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यात मागील अडीच वर्षांत दोन हजार ८६ जण रस्ते अपघातात ठार झाले आहेत. त्यात बाराशे दुचाकीस्वार आणि पाचशे पादचारी असल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत झाली आहे. रस्ते अपघातात दररोज सरासरी दोघांचा जीव जात असून त्यात एक दुचाकीस्वार असल्याचेही निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे.