Solapur : रब्बी पीकविम्यासाठी २५ लाख अर्ज

‘एक रुपयात विमा’मुळे चौपट अर्ज दाखल
Solapur news
Solapur newsesakal

सोलापूर : ‘एक रुपयात पीक विमा’ या राज्य सरकारच्या निर्णयामुळे रब्बीच्या पीक विम्यासाठी गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल चौपट अर्ज अपलोड झाले आहेत. राज्यातील २५ लाख ३७ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले असून आता राज्य सरकारला विमा कंपनीला शेतकरी हिश्यापोटी जवळपास ७०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. उर्वरित पिकांच्या अर्जानंतर हा हिस्सा वाढू शकतो.

Solapur news
Mental Health Tips : दिवसभरातील ताण-तणावानंतर स्वत:ला असे करा रिचार्ज, करा 'या' अ‍ॅक्टिव्हिटी

सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांनी गतवर्षी रब्बीचा पीक विमा भरला होता. यंदा ही संख्या ५२ हजारांवर पोचली आहे. दरम्यान, रब्बी ज्वारीच्या (बागायत व जिरायत) पीक विम्याचा अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. राज्यातील २५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केले आहेत. गुरुवारी (ता. ३०) ज्वारी पिकासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून अनेक शेतकऱ्यांना शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज करता आलेला नाही. आता गहू, कांदा, हरभरा, भात, उन्हाळी भुईमूग अशा पिकांसाठी अर्ज करण्याची मुदत बाकी आहे. ‘एक रुपयात पीक विमा’अंतर्गत यंदा रब्बी हंगामातील पीक विमा अर्जांची संख्या ८० लाखांहून अधिक होईल, असा अंदाज आहे. विमा उतरविण्यासाठी केंद्र सरकारने ‘पीएमएफबीवाय’ पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.

Solapur news
Parenting Tips: मुलांच्या रागावर असं मिळवा नियंत्रण, या आहेत सर्वात सोप्या टिप्स

दुष्काळामुळे अर्जाची संख्या वाढणार

राज्यातील ४० तालुक्यांसह एक हजार ४१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. अजूनही काही महसूल मंडळांचा दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील प्रस्ताव आहेत. पावसाअभावी खरीप वाया गेला असून पहिल्या टप्प्यातील २५ टक्के अग्रिम शेतकऱ्यांना मिळाला, पण अद्याप उर्वरित ७५ टक्के रक्कम मिळालेली नाही. तरीपण, रब्बी पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना भरपाईची आशा असल्याने एक रुपयात विमा अर्जाची सोय असल्याने यंदा अर्जदार शेतकऱ्यांची संख्या चौपट होईल, अशी सद्य:स्थिती आहे. राज्य सरकारला खरीपनंतर रब्बी पीक विम्यासाठी विमा कंपन्यांना अडीच हजार कोटी रुपये द्यावे लागतील, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

शेतकऱ्यांना पुन्हा संधी

गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांद्यासाठी : १५ डिसेंबरपर्यंत

उन्हाळी भात व भुईमूग पिकासाठी : ३१ मार्च २०२४ पर्यंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com