सोलापूर : अर्थव्यवस्थेच्या सिद्धांताचे जनक बाबासाहेब

ॲड. प्रकाश कांबळे : डॉ. आबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’शी संवाद
ॲड. प्रकाश कांबळे
ॲड. प्रकाश कांबळे sakla

सोलापूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जरी उच्चारले तरी भारतीय माणूस रोमांचित होतो. इतके ते प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब अनेक विषयात पारंगत व प्रभुत्व असणारे देशातील संपूर्ण विश्वातील महान दायित्व लाभलेली व्यक्ती, असे म्हटले तर वावगे होणार नाही. ते अर्थतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ, लोकशाही मुलक, कामगाराचे जनक, जलतज्ज्ञ, सामाजिक, राजनीतिक, सांस्कृतिक, धार्मिक, स्त्रीमुक्ती अशा अनेक विविध विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. जगातील अत्यंत बुद्धिमान व्यक्तींमध्ये ते एकमेव भारतीय म्हटले पाहिजे, असे मत बॅंकेचे निवृत्त अधिकारी ॲड. प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केले.

श्री. कांबळे यांनी डॉ. आंबेडकराच्या मूळच्या अर्थशास्त्रीय अभ्यास व संशोधनाचा प्रवास ‘सकाळ’शी बोलताना उलगडला.

डॉ. बाबासाहेबांचा मूळ अभ्यासाचा विषय अर्थशास्त्र होता. भारताचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन हे डॉ. बाबासाहेबांना आपले गुरू मानतात. त्यांनी शिक्षणात प्राचिन भारतीय व्यापार, हिंदुस्थानातील प्रांतिक रचनेची उत्क्रांती व भारतीय रुपयांचा प्रश्न या विषयावर प्रबंध सादर केले. त्यांनी पुढीलप्रमाणे शासनाच्या दायित्वाची व्याख्या केली. आर्थिक उन्नतीच्या व उत्पादन क्षमतेबाबत म्हणायचे अतिउच्च उत्पादन क्षमतेचा विचार करून लोकांच्या आर्थिक जीवनाचे नियोजन करणे व तसेच खाजगी उत्पादकांना कोणतीही आडकाठी न करता संपत्तीचे समान वाटप होईल, अशा रीतीने आर्थिक नियोजन करणे हे सरकारचे दायित्व आहे.

अर्थशास्त्रावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आहेत.

१. ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी

२. द इव्होल्यूशन ऑफ प्रोविन्शियल इंडिया

३. द प्रॉब्लेम ऑफ रुपी इटस ओरिजीन ॲड सोल्यूशन

त्यापैकी तिसऱ्या क्रमांकांचे पुस्तक चलन विषय अर्थशास्त्रावरील एक उत्कृष्ट ग्रंथ मानला जातो.

जातीव्यवस्था व अस्पृश्यता सारख्या सामाजिक समस्याचे आर्थिक पैलू मांडले. जातीव्यवस्थेमुळे केवळ श्रमांची विभागणी केली नसून श्रमिकांची ही विभागणी केली आहे. तसेच जातिव्यवस्थेमुळे श्रमाची व भांडवलाची गतिशीलता कमी झाली आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विकासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. डॉ. बाबासाहेब आर्थिक लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते होते. डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी घटनेत समाविष्ट करून आर्थिक लोकशाहीचा हेतू विशद केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक अर्थतज्ज्ञ म्हणून भारतीय समाजातील प्रत्येक घटकाचे आर्थिक हित जपल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com