
सोलापुरात माळशिरस तालुक्यातल्या बाभूळगावात एक हृदयद्रावक अशी घटना घडलीय. सात जन्माची साथ देण्याचं वचन देत लग्नाची गाठ बांधल्यानंतर अवघ्या २४ तासातच नववधूनं जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळं लग्नघरात शोककळा पसरली. जानकी बाळासाहेब गळगुंडे असं तरुणीचं नाव आहे. १३ मे रोजी तिचं लग्न झालं आणि १४ मे रोजी तिचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.