Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Solapur Flood : अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपूंजी आहे. सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी गोगावले यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली.
Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले
Updated on

Summary

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मंत्री जयकुमार गोरे व भरत गोगावले यांनी बार्शी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या ताफ्यास अडवत सरकारच्या तुटपुंज्या मदतीवर संताप व्यक्त केला.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे सुर केले आहेत. दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री भरत गोगावले हे आज बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीची पाहणी केली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी भरत गोगावले यांचा ताफा अडवत सरकारच्या मदतीवर तिखट शब्दात नाराजी व्यक्त केली. तुटपुंजी मदत करुन शेतकऱ्यांची टिंगल लावलीय का असा सवाल करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com