Buddhist scholar Vijay Salve claims political interference changed Solapur’s processions since 2000.
Sakal
सोलापूर
Vijay Salve:'साेलापूरातील राजकीय हस्तक्षेपामुळे मिरवणुकांचे स्वरूप बदलले'; बौद्धाचार्य विजय साळवे यांचे मत, २००० पासून परिस्थिती बदलली
Since 2000, Solapur Processions Altered by Politics: सध्या सोलापूर शहरात सुरू असलेल्या डीजेमुक्त चळवळीच्या पार्श्वभूमीवर बौद्धाचार्य विजय साळवे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले. १९८० च्या दशकात सोलापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच गणेशोत्सवातील मिरवणुका निघत.
सोलापूर: जिथे कामगार वर्ग जास्त असतो, तिथे उत्सवप्रिय लोकांची संख्या अधिक असते. या न्यायाने सोलापूर हे उत्सवप्रिय शहर आहे. ही स्थिती पूर्वीपासूनच आहे मात्र, २००० पासून सर्वच उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. सर्व उत्सव मंडळावर राजकीय नेत्यांचे वर्चस्व वाढले असल्याने त्याचा मूळ सामाजिक चेहरा हरवला असल्याचे मत, बौद्धाचार्य व समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव विजय साळवे यांनी व्यक्त केले.

