

Mounting Cane Dues Spark Farmers’ Outrage in Solapur district
sakal
-प्रदीप बोरावके
माळीनगर : सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांकडे यंदाच्या गाळप हंगामात त्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसारची फेब्रुवारीअखेर देय असलेली सुमारे ११०७ कोटी रुपयांची ऊसबिले थकली आहेत. जिल्ह्यातील हंगाम बऱ्यापैकी आटोपला असला तरीही ऊसबिले मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.