माेठी बातमी ! ‘सुरत-चेन्नई’तील २२२ किमी मार्ग बीओटीवर होणार; भारतमाला योजनेची मुदत संपल्याने निर्णय..

Surat Chennai corridor: भूखंड संपादनाच्या अडचणी, आर्थिक भार आणि भारतमाला योजनेत आलेल्या विलंबामुळे संबंधित विभागाला नव्या पद्धतीचा विचार करावा लागला. बीओटी अंतर्गत खाजगी कंपन्या रस्ता बांधणार, काही वर्षे त्याचे संचालन आणि टोलद्वारे खर्च वसूल करणार व नंतर सरकारकडे हस्तांतरित करणार आहेत.
A 222 km section of the Surat–Chennai corridor will now be developed under the BOT model following Bharatmala deadline expiry.

A 222 km section of the Surat–Chennai corridor will now be developed under the BOT model following Bharatmala deadline expiry.

Sakal

Updated on

-विठ्ठल सुतार

सोलापूर : केंद्र शासनाने भारतमाला योजनाच रद्द केल्याने सुरत-चेन्नई महामार्गाचे काम लांबणीवर पडले आहे. आता सुरत-चेन्नई महामार्ग ग्रीनफिल्ड नाशिक ते अक्कलकोट (२२२ किमी) मार्ग बीओटी तत्त्वावर (बांधा, वापरा व हस्तांतर) देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळेल आणि प्रत्यक्षात नोव्हेंबर २०२६ पासून कामास सुरुवात होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com