

Solapur
esakal
जेऊर: राज्यात टीईटी परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना अत्यंत गंभीर असून, यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या, उमेदवारांच्या आणि शिक्षकांच्या भावना दुखावणाऱ्या या घटनेचा महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्य कन्नड विभाग प्रमुख बसवराज गुरव यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.