Solapur : शेतीचा कणा असणारी बैलजोडी नामशेष ; शिवारातली 'सर्जा राजा' ची हाक गायब

ग्रामीण भागातील शेतीचा कणा असलेली बैलजोडी शेतीच्या आधुनिकतेच्या ननादात गायब झाली आहे.सकाळच्या रामप्रहरी शिवारातली कानाववर येणारी सर्जा राजा,ढवळ्या पवळ्या वरची अवीट शेतकरी गाणी काळाच्या पडद्याआड गेली आहेत.
सोलापूर
सोलापूर sakal

सलगर बुद्रुक : ग्रामीण भागातील शेतीचा कणा असलेली बैलजोडी शेतीच्या आधुनिकतेच्या ननादात गायब झाली आहे.सकाळच्या रामप्रहरी शिवारातली कानाववर येणारी सर्जा राजा,ढवळ्या पवळ्या वरची अवीट शेतकरी गाणी काळाच्या पडद्याआड गेली आहेत.आधुनिक शेतीच्या नावाखाली शेतीचे मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले अन शेती,शेतकरी अन बैलजोडी हे समीकरण गायब झाले आहे.परिणामी हताच्या बोटावर मोजण्या इतपतच देशी गोवंश शिल्लक राहिला आहे.

महाराष्ट्राच्या मातीशी नाळ असणारी खिलारी बैल जोडी - पांढराधमक रंग, ऐटबाज शिंगे, काटक उंची, पाणीदार तीक्ष्ण डोळे, ताकदवान शरीर.शेतकाम असो किंवा शर्यत हे तगडे बैल सर्वात पुढे असायचे.बैलपोळा सण म्हणजे बैलांची व शेतकऱ्यांची जणू दिवाळीच असायची.ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा कणा म्हणजे बैल जोडी असे समीकरण असायचे.

का गायब झाली बैलजोडी - संकरित गाई वाढल्यामुले देशी गोवंशाची मोठ्या प्रमाणात पैदास होत नाही. त्यांना सांभाळण्याचा खर्च देखील अनेकांना परवडत नाही. बाहेरच्या राज्यातील गिर सारख्या गाईच प्रमोशन करून त्यांचं दूध मोठ्या प्रमाणात विकल जात आहे. मराठी मातीतल्या खिल्लारीचंही दूध दुसऱ्या वर्गात मोडते व तेही तितकंच पौष्टिक आहे पण सरकारी अनास्थेमुळे तिच्या कडे दुर्लक्ष झाले व हळूहळू ही जात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.यांत्रिकीकरणामुळे बैलांची कामे कमी झाली.तरिही शेती व मातीशी नाळ असणाऱ्या जुन्या जाणत्या कांही बोटावर मोजण्या इतपत शेतकऱ्यांकडे अजूनही बैल जोडी शिल्लक आहे.दरम्यान याबाबत लवकर पाऊल उचलले नाही तर आणखी काही वर्षांनी आपल्या पुढच्या पिढीला ही सर्जा राजाची खिल्लारी जोडी फक्त फोटोतच पाहायला मिळेल की काय अशीच वेळ येऊन ठेपली आहे.

सोलापूर
Solapur : माळशिरस तालुक्यातून अरुण थिटे ईश्वर चिठ्ठीत विजयी ; लेबर फेडरेशन निवडणूक निकाल

सधन शेतकरी कर्जबाजारी : पूर्वी घरोघरी गाई व बैलजोडी पहायला मिळायची.गाईमूळे घरात दूध दुभत्याची कमी नसायची.गाईच्या दुधामुळे शेतकऱ्याच्या अंगात शेती कसण्याची ताकत यायची.शेतीची बारा महिन्याची कामे बैलजोडी करायची.त्या काळात शेतकरी सधन होता.शेतकऱ्यांच्या डोक्यावर बॅंकांचा कर्जाचा भार नसायचा.

शेतकरी स्वताची शेती करून भाड्याने किंवा सावडीने दुसऱ्याच्या शेतात कामे करायचा.कष्टामुळे शेतकऱ्यांची शारीरिक व आर्थिक बाजू भक्कम असायची.पण आधुनिकतेच्या नादाला लागून कित्तेक शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या,तारण दिल्या.कांही शेतकरी भूमिहीन झाले आहेत.त्यामुळे दारातून गोवंश गायब झालेल्या शेतकऱ्यांच्याकडे शेतीही राहिली नाही आशी परिस्थिती आहे.

संतोष जाधव, शेतकरी सलगर बुद्रुक,आमच्याकडं पिढ्यान पिढ्या पासणं बैलं हायती.सध्याच्या काळात बैलं परवडत न्हाय.तरीबी आमाला बैला शिवाय करमत न्हाय.बैलाशिवाय शेती कसदार व्हत न्हाय.गावात लय थोड्या लोकाकडं बैलं जोडी हाय.

-महेश पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com