Ujani Dam: 'उजनीतून यंदा शेतीसाठी तीनदा सुटणार पाणी'; जानेवारीअखेर पहिले आवर्तन; ‘कालवा सल्लागार’मध्ये होणार अंतिम नियोजन

Three Rounds of Irrigation Water from Ujani Planned: जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात सध्या दौंडवरून पाच हजार क्युसेकच्या विसर्गाने पाणी जमा होत आहे. त्यामुळे धरणातून आता विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक आणि भीमा नदीतून १४०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
Farmers Relieved as Ujani to Release Water Thrice for Agriculture This Year

Farmers Relieved as Ujani to Release Water Thrice for Agriculture This Year

Sakal

Updated on

सोलापूर : उजनी धरण सध्या ११० टक्के भरले असून, धरणात ११७ टीएमसी पाणी आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा शेतीसाठीचे पहिले आवर्तन २० जानेवारीनंतर सुटणार आहे. त्यानंतर १ मार्च ते १५ जून या काळात दोनदा शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. पण, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणातील पाण्याचे अंतिम नियोजन ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com