Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

सध्या उपसा सिंचन योजना, कालवा व बोगद्यातून एकूण तीन हजार ८०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे जलस्त्रोतांना भरपूर पाणी आहे, शेतीत पेरण्या सुरू आहेत. त्यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी शेतकरी वापरत नाहीत, असे चित्र आहे. कालव्याचे पाणी सध्या थेट नदीला जाऊन मिळत आहे.
Water Discharge from Ujani Rescheduled Owing to Pandharpur Pilgrim Crowd
Water Discharge from Ujani Rescheduled Owing to Pandharpur Pilgrim CrowdSakal
Updated on

सोलापूर : सध्या दौंडवरून उजनी धरणात १४ हजार ६०० क्युसेकची आवक सुरू असून आठ दिवसांत धरण १०० टक्के होईल, अशी स्थिती आहे. आषाढीमुळे धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी बंद करण्यात आले आहे. मात्र, पावसाळा आणखी तीन महिने असल्याने सोमवारी (ता. ७) रात्रीपासून उजनीतून नदीत पाणी सोडले जाणार आहे. सध्या पंढरीत वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्याने उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर टाकण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com