शेतकऱ्यांसाठी खुषखबर! रब्बीसाठी उजनीतून 27 जानेवारीला पाणी

सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो
Ujani
Ujaniesakal
Summary

सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो

सोलापूर : उजनी धरणात (Ujani dam) सध्या एकूण 121.62 टीएमसी पाणी असून त्यात 57.96 टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. सध्या धरणातील पाण्याची टक्‍केवारी 108.19 टक्‍के इतकी आहे. मागच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरण अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेले यंदा शेती (Agriculture)सोलापूर (Solapur) शहराला उन्हाळ्यात पाणी टंचाई (Water scarcity) जाणवणार नाही. 27 जानेवारीला रब्बी पिकांसाठी (Rabi crops) कॅनॉल, बोगदा व उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.

Ujani
'उजनी'च्या निर्मितीनंतर उत्तर ध्रुवीय बीनहंसचे पहिल्यांदाच आगमन

सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु मागील काही वर्षांत साखर कारखानदारीच्या माध्यमातून खरीप पिकांखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. उजनी धरण हे सोलापूर (Solapur), नगर (Ahmednagar), पुणे (Pune) जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. दरम्यान, रब्बीच्या तुलनेत खरीप पिकांखालील क्षेत्र वाढल्याने जलसंपदा विभागाने उजनीतून पाणी सोडवण्याच्या नियोजनात बदल केला आहे. तरीही, रब्बीखालील पिकांचे क्षेत्र लक्षणीय असल्याने आता शेती पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी वाढू लागली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून जलसंपदा विभागाने आता जानेवारीअखेर (27 जानेवारीपासून) उजनीतून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. कॅनॉल, बोगदा, कालव्यातून जवळपास पाच टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर साधारणत: फेब्रुवारीअखेरीस दुसरे आवर्तन सोडले जाईल, असा अंदाज आहे. यंदा उशिरापर्यंत नदीत पाणी असल्याने आणि शेतकऱ्यांचे पाण्याचे साठे पाण्याने भरल्याने धरणातील पाणीसाठा मायनसमध्ये जाणार नाही, असा विश्‍वास जलसंपदा विभागाला आहे.

Ujani
उजनी जलाशयात चक्रवाक बदकांचेही आगमन

कालवा सल्लागार समितीत अंतिम निर्णय

रब्बी पिकांसाठी 28 जानेवारीला पाणी सोडण्याचे नियोजन आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब होईल. धरणात सध्या 100 टक्‍क्‍यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा, सोलापूर

शहरातून अजूनपर्यंत मागणी नाही

सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा होणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शहरासाठी पाणी सोडण्याची मागणी प्राप्त झालेली नाही. महापालिकेच्या वतीने पाणी सोडण्यासंदर्भात मागणी प्राप्त झाल्यानंतर भीमा नदीतून पाणी सोडले जाईल, असेही जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com