राज्य लोकसेवा परीक्षेपासून दिव्यांग वंचित

प्रशासनाचा भोंगळ कारभार : संघटना आयोग आणि प्रशासनास न्यायालयात खेचणार
State Public Service Examination
State Public Service Examinationesakal

सांगली : राज्‍य लोकसेवा आयोग, आणि स्थानिक प्रशासनाच्या चुकीमुळे राज्यातील शेकडो दिव्यांग राज्य लोक सेवा आयोगाच्या परीक्षेपासुन वंचित राहिले.याबाबत राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र यासह काही सेवाभावी संघटना राज्य लोकसेवा आयोग आणि महाराष्‍ट्र शासनाविरुध्द मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

अंध, आणि अपंगासाठी सक्रिय असलेल्या या संघटनांकडे रविवारी (ता. ३) रोजी झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेबाबत अनेक दिव्यांगाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. याच तक्रारीस अनसरुन राष्ट्रीय दृिष्टहीन महासंघाने ही याचिका दाखल करण्याचे ठरविले आहे.

याबाबत माहिती अशी, या परीक्षेसाठी दिव्यांगाची व्यवस्था स्वतंत्र परिक्षा केंद्रावर करतात. येथे अस्थिव्यंग अपंग परीक्षार्थिंना पहिल्या मजल्यावर परीक्षेसाठी बसविले जाते.तर अंध आणि हाताचे व्यंग असणा-या परिक्षार्थीसाठी लेखन मदतनिस घेण्याची परवानगी असते. पण या लेखन सहाय्यकाचे नाव लोकसेवा आयोगास अर्ज सादर करतानाच कळवावे लागते. या सर्व प्रक्रिया पुर्ण केल्यानंतरही परिक्षार्थीसाठी प्रवेशपत्र आल्यानतंर त्यामध्ये लेखन सहाय्यकाच्या नावाचा उल्लेखच नसल्याचे निदर्शनास आले.

याबाबत या दिव्यांग परिक्षार्थीनी तातडीने स्थानिक जिल्हाधिका-यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण बहुस्ंख्य ठिकाणी जिल्हाधिका-यांनी दिव्यांगाना भेट दिली नाही.दिव्यांगानी प्रत्यक्ष परिक्षाकेंद्रावर जाऊन परिक्षेला बसण्यास परवानगी मागितली तर केंद्रप्रमुखांनीही ती नाकारली.उलटपक्षी अन्य काही दिव्यांग परिक्षार्थीनी वशिल्याने परिक्षेस बसण्यासाठी काही उठाठेव केली. त्यांच्यासाठी परवानगी नाकरलेल्या परिक्षार्थीच्या सहाय्यकास लेखन सहाय्यक म्हणुन पाठविण्यात आले.

पुण्यातील एका परिक्षा केंद्रावर तर एका दिव्यांगाची बैठक व्यवस्था दुस-या मजल्यावर करण्यात आली. त्याला तेथे नेण्यासाठी कोणी मदतनीस नसल्याने त्यालाही परिक्षेपासुन वंचित रहावे लागले.असे अनेक प्रकार मुबंई, मराठवाडा, विदर्भात घडल्याच्याही तक्रारी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या कार्यकर्त्यांकडे दाखल झाल्या आहेत.

दिव्यांगाना बेदखल ठरवण्याची प्रशासनाची, लोकसेवा आयोगाची पध्दत नवी नाही. महाराष्टात अंध अपगांना नेहमीच दखल ठरविले जाते याचा जाब आम्ही आता त्यांना न्यायालयातच विचारणार आहोत. त्यामुळे आता या उर्मट आधिकार्यांना न्यायव्यवस्थेकडुनच सरळ करू

-दत्तात्रय जाधव, महाराष्ट्र सचीव राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ, मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com