सांगलीत उसाचे ट्रॅक्टर पेटवले, स्वाभिमानी आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे
सांगली
सांगलीइसकाळ
Summary

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे

सांगली : सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीचे आंदोलन हिंसक वळणावर पोहचले आहे. गुरुवारी उशिरा रात्री ऊस वाहतूक करणारे राजारामबापू, क्रांती या कारखान्याचे ट्रॅक्टर पेटवण्यात आले. तसेच विश्वास कारखान्याच्या ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न झाला. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राजारामबापू कारखान्याचे सर्वेसर्वा पालकमंत्री जयंत पाटील आहेत. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुण लाड तर विश्वास कारखान्याचे आमदार मानसिंग नाईक अध्यक्ष आहेत.

राजारामबापू कारखान्याचा ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे पेटवण्यात आला तर क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यात बलवडी फाटा येथे गुरुवारी रात्री उशिरा पेटवण्यात आला. विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टरही तांदुळवाडी येथेच पेटवण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआर्पी मिळावी, अशी मागणी केली आहे. या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला मात्र सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. अन्य दोन कारखाने जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. मात्र राजारामबापू, क्रांती आणि विश्वास काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत. त्यामुळेच स्वाभिमानीचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत.

सांगली
मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक पानी प्रतिज्ञापत्र केला सादर

बुधवारी राजाराम बापू कारखान्याच्या 35 वाहनांची हवा सोडण्यात आली यापूर्वी तासगाव तालुक्यात कुमठे फाटा, कडेगाव तालुक्यात रामपूर फाटा याठिकाणी वाहनाची हवा सोडून वाहतूक बंद पाडली आहे. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दोन वेळा मोटरसायकल सर्व कारखान्यावर मोटरसायकल रॅली काढण्यात आली. तरीही एकरकमी एफआरपी जाहीर होत नाही. त्यामुळे आंदोलन हिंसक वळनावर पोहचले आहे. आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

याबाबत महेश खराडे यांना प्रतिक्रिया दिली, कोल्हापूर जिल्ह्याला जे जमते ते सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना का जमत नाही. दोन्ही जिल्ह्यात किती अंतर आहे. त्या ठिकाणी सहकारी आणि खासगी अशा दोन्ही कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली आहे. सहकारातील 15 ते 25 वर्षे सुरू असलेले कारखाने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आमचे कार्यकर्ते आणि शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यातूनच पेटवा पेटवी सुरू आहे आमचे कार्यकर्ते नाइलाजाने हे करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा अंत न बघता तात्काळ एकरकमी एफआरपी जाहीर करावी.

सांगली
पाक विरुद्ध कांगारुंची अखिलाडूवृत्ती, गंभीर-भज्जीनं फटकारले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com