Loksabha 2019 : मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून राष्ट्रवादीला मंगळवेढ्यात खिंडार

Loksabha 2019 : मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून राष्ट्रवादीला मंगळवेढ्यात खिंडार

मंगळवेढा : माढा लोकसभा  मतदारसंघातील उमेदवारीवरून झालेल्या रणकंदनानंतर अखेर मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मंगळवेढा शहरातील राष्ट्रवादीत मोठे खिंडार पडले असून, पर्यायाने याचे लोकसभा व विधानसभेवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तालुका पवारांना मानणारा होता. 'पवार बोले, तालुका हाले' अशी परिस्थिती होती. याच बालेकिल्ल्याला 2009 साली मोठे भगदाड पडले आणि हे भगदाड बुजवण्याच्या दृष्टीने वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गोणेवाडी व येड्राव वगळता तालुक्यातून राष्ट्रवादी संपली. स्वाभिमानी पक्षावर आमदार झालेले भारत भालके हे नंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सातत्याने सलगी करत राहिले होती.

अखेर 2014 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला तरीही शरद पवार यांच्या समवेत कायम संपर्कात राहिले. माढा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून मोहिते- पाटलाला डावलले जात असल्यावरून समर्थकांची बैठक अकलूज पार पडली. या बैठकीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय हातवर करू घेतला या बैठकीला नगराध्यक्षा अरुणा माळी  आणि त्यांचे पती सोमनाथ माळी विजय बुरकुल पक्षनेते अजित जगताप रामेश्वर मासाळ भारत पाटील बाबा कौडूभैरी सुर्यकांत ठेंगील जयंत साळे आदी सह मोहिते पाटलांवर प्रेम करणारे कार्यकर्ते तालुक्यातून मोठ्या संख्येने गेले होते. त्यांनी केलेल्या आवाहनाला या सर्वांनी हात वर करत समर्थन केल्यामुळे राष्ट्रवादीचे शहरात असलेल्या बुरूज ढासळण्याच्या परिस्थितीत झाला भारत भालके यांच्या यांना काँग्रेसमधील काही गटाचा छुपा विरोध होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी मदत होत असते. याच मदतीचा मोठा लाभ काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवाराला होत आहे. परंतु मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर या सर्व घडामोडी बदलल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात राष्ट्रवादी नसली तरी शहरात असलेले अस्तित्व संपुष्टात येणार आहे, आमदार परिचारक, माजी मंत्री ढोबळे यानी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली.

मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदे यांना तर विधानसभेला आमदार भारत भालके यांनाही मताधिक्य घेण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे...

शेतकरी केंद्र बिंदू मानून 6 जिव्हेला 35 तालुक्यातील 12 लाख हेक्टर ओलिताखाली येणाय्रा कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठीचा विरोध आणि राष्ट्रवादीत वरिष्ठांकडून होत असलेली कुचंबणा यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिथे मोहिते-पाटील तिथे आम्ही.

- विजय बुरकूल, प्रमुख, विजय प्रताप युवा मंच, मंगळवेढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com