सीमाभागात गैरसोयच ; बससेवा, बेळगाव-मिरज पॅसेंजरची मागणी

Karnataka
Karnatakasakal

उगार खुर्द : कर्नाटक-महाराष्ट्राच्या (Karnatka, Maharastra)दरम्यान गेल्या सुमारे दीड वर्षापासून थेट बससेवा सुरू न झाल्याने दोन्ही राज्यात विविध भागात राहणाऱ्या सीमाभागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. दिवाळी तोंडावर आली असून दोन्ही राज्यांच्या दरम्यानची बससेवा सुरू व्हावी. तसेच बेळगाव-मिरज (Belguam, Miraj) दरम्यान पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

कोरोनाचा प्रभाव वाढल्याने दीड वर्षापासून कर्नाटक-महाराष्ट्र बस व बेळगाव-मिरज पॅसेंजर रेल्वे बंद आहे. परिणामी प्रवाशांना ठिकठिकाणी जाणे अशक्य झाले आहे. अलीकडे कर्नाटक-महाराष्ट्रातील मंदिरे खुली झाली आहेत. साखर कारखान्यांचे गळीत हंगाम व संस्था सुरू झाल्या आहेत.

कर्नाटक-महाराष्ट्राच्या विविध भागात रूग्णांवर उपचार, मंगल कार्ये, बाजार, धार्मिक कार्यक्रमासाठी नेहमी ये-जा सुरू असते. मात्र बेळगाव-मिरज पॅसेंजर रेल्वे बंद आहे. तसेच विजापूर, अथणी, जमखंडी, चिक्कोडी भागाकडून मिरज, कोल्हापूर, पुण्याकडे जाणाऱया-येणाऱय़ा बस कागवाड सीमेपर्यंत आहेत. तेथून बसमधून महाराष्ट्रात जावे लागते. तर महाराष्ट्रातून कर्नाटकात येताना कागवाड येथे बस बदलावी लागते. त्यामुळे वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. यासाठी दोन्ही राज्यांनी बससेवा व पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे.

कागवाड येथे बस बदलाव्या लागतात. त्यामुळे प्रवासाला वेळ लागून गैरसोय होते. यासाठी कर्नाटक-महाराष्ट्राच्या दरम्यान थेट बससेवा सुरू करावी.

-माधुरी माळी, ग्रा. पं. सदस्या, मंगसुळी

बेळगाव-मिरज दरम्यान पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने व्यापारी, ग्रामस्थ, कामगारांची गैरसोय व प्रवास खर्चिक होत आहे. त्यासाठी या मार्गावर पूर्ववत पॅसेंजर रेल्वे सुरू कराव्यात.

-नंदिनी फराकटे, माजी उपनगराध्यक्षा, उगार खुर्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com