बाळासाहेबांच्या मुलाने शब्द फिरविला : पंजाबराव पाटील

बाळासाहेबांच्या मुलाने शब्द फिरविला : पंजाबराव पाटील
Updated on

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी केवळ थकबाकीदारांनाच माफी जाहीर केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शब्दाचे पक्के होते. मात्र, त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीबाबत शब्द फिरवून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.

हेही वाचा - कर्‍हाड पोलिस लय धडाकेबाज... मोक्काचे अर्धशतक 

येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांनी शब्द बदलून सरसकट कर्जमाफी असे जाहीर करावे, अन्यथा बळिराजा शेतकरी संघटना राज्यभर "कर्ज बुडवा शेतकरी वाचवा...' हे आंदोलन करतील, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.
 
शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना पंजाबराव पाटील म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा. कर्जमाफीची घोषणा करताना त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना त्यांनी शब्द फिरविला आहे. मुळात शेतीसाठी लागणाऱ्या कर्जाचा समावेश माफीत होणे गरजेचे असताना केवळ थकीत पीक कर्जाचा समावेश केला आहे. मुळात पीक कर्ज हे प्रत्येक वर्षी दहा ते 15 टक्‍क्‍याने वाढवून मिळते. सोसायटीचा सचिव आणि अध्यक्षांच्या मदतीने पीक कर्ज वाढवून घेतले जाते. या वाढीव दहा टक्के कर्जातून शेतकरी आपली मागील कर्जाची परतफेड करतो.

जरुर वाचा - खुषखबर...नियमित कर्जदारांना मिळणार दुप्पट लाभ !

त्यामुळे वीस हजार रुपये पीककर्ज मिळणाऱ्या शेतकऱ्यांचा कर्जाचा आकडा दीड लाखांवर गेला आहे. मुळात पीक कर्जाऐवजी शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची थकबाकीचा आकडा अधिक आहे. त्यामुळे शेतीपूरक व्यवसायाच्या कर्जाचा माफीत समावेश करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी येत्या आठ दिवसांत सरसकट कर्जमाफी असा शब्द प्रयोग करावा. शेतकरी संघटनेने केलेली ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मान्य करून शब्द बदलतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

कर्ज बुडवा शेतकरी वाचवा

एक जानेवारीपर्यंत हा बदल केला नाही तर कऱ्हाडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून आंदोलनास सुरवात होईल. कर्ज बुडवा शेतकरी वाचवा, हे आंदोलन राज्यभर सुरू होईल. या आंदोलनाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
या वेळी बळिराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, उपाध्यक्ष सुनील कोळी, उत्तम खबाले, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विश्‍वास जाधव, कऱ्हाड तालुका कार्याध्यक्ष नसीर पटेल, आण्णा शेंडगे, तसेच रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan resort swimming pool accident
Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Marathi News Esakal
www.esakal.com