उजनीत येणारे पाणी झाले कमी

Ujani-Dam
Ujani-Dam

15 दिवसांत धरणात आले 15 टीएमसी पाणी
सोलापूर - पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये घट झाली आहे. आज सकाळी सहा वाजता धरणात पाच हजार 117 क्‍युसेकने पाणी येत होते. मागील 15 दिवसांमध्ये धरणात 14.28 टीएमसी पाण्याची भर पडली आहे.

मागील आठवड्यात पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. मात्र, आता पाऊस ओसरल्याने उजनीत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये घट झाली आहे. मागील 15 दिवसांपूर्वी धरणाचा पाणीसाठा वजा 59 टक्‍क्‍यांपर्यंत गेला होता. मात्र, आज सकाळी धरणाचा पाणीसाठा वजा 31.33 टक्के इतका झाला आहे. म्हणजेच धरणाचा पाणीसाठा मागील 15 दिवसांत 28 टक्‍यांनी वाढला असल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्यात कधी पाऊस सुरू होणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com