कॉंग्रेसचा आमदार निवडून काय उपयोग? : विखे पाटील

Vikhe Patil says What is the use of Congress MLA
Vikhe Patil says What is the use of Congress MLA

संगमनेर, ता. 8 ः ""निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी तालुक्‍याला 25 वर्षे वाट पाहावी लागली. टॅंकरद्वारे पाणी देण्यात आणि "दुष्काळाचे मॉडेल' अशी तालुक्‍याची प्रतिमा निर्माण करण्यात त्यांनी धन्यता मानली. आता ती वेळ येणार नाही. राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा आमदार निवडून देऊन काय उपयोग? तालुक्‍यात परिवर्तन करा; मी दीड वर्षात पाणी देतो,'' अशी ग्वाही गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.


तालुक्‍यातील अंभोरे येथे सुमारे दोन कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यात विखे पाटील बोलत होते.

अंभोरे येथे रणजितसिंह देशमुख यांच्या "होम पीच'वर थोरातांवर टीका करताना ते म्हणाले, ""प्रश्न सोडविण्यासाठी लोकांना दूध संघात घेऊन जाण्याची वेळ तुमच्यावर आली. आश्वासनांची पूर्तता फक्त युती सरकारच करील. अंभोऱ्यासाठी प्रवरा नदीतून पाणी देता आले असते; मात्र इच्छाशक्ती नसलेली माणसे सत्तेत जास्त दिवस बसली. निळवंडे कालव्यातून दीड वर्षात पाणी देऊ. राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार आहे. राज्यात कॉंग्रेसचे आमदारच निवडून येणार नाहीत अशी परिस्थिती असेल, तर या तालुक्‍यात कॉंग्रेसचा आमदार निवडून येऊन उपयोग तरी काय? युतीचा आमदार निवडून गेला तरच 25 वर्षे प्रलंबित राहिलेली कामे मार्गी लागू शकतील.''

विद्यार्थी नसलेल्या शाळेचे मुख्याध्यापक
थोरात कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक शाळिग्राम होडगर यांनी भाषणात, आमदार बाळासाहेब थोरात यांना मिळालेले प्रदेशाध्यक्षपद म्हणजे "विद्यार्थी नसलेल्या शाळेचे मुख्याध्यापक' अशी अवस्था आहे. देश व राज्यात कॉंग्रेसची दुरवस्था झाल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com