औज बंधाऱ्यात पाणी पोचले; तीन महिन्यांचा प्रश्न मिटला

Water reached in Ouj Bund The issue for three months ended
Water reached in Ouj Bund The issue for three months ended

सोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी आज सोमवारी औज बंधाऱ्यात पोचले. रात्री उशिरा बंधारा ओव्हरफ्लो होऊन वाहण्यास सुरवात होइल. बंधारा साडेचार मीटरपर्यंत भरून घेण्यात येणार आहे तसेच चिंचपूर बंधाराही भरुन घेतला जाणार आहे.

महापालिकेने केलेल्या नियोजनानुसार यंदा पहिल्यांदाच घोषित वेळेत पाणी बंधाऱ्यात पोचले आहे. त्यामुळे आगामी तीन महिन्यांचा पाण्याचा प्रश्‍न तूर्त सुटला आहे. 

सोलापूर शहराला सध्या चार दिवसाआंड पाणीपुरवठा सुरु आहे. औज बंधाऱ्यासह चिंचपूर बंधारा साडेचार मीटरपर्यंत भरून घेतला जाणार आहे. त्यामुळे आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत शहरात पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. उजनी-सोलापूर योजनेवरून तिबार पंपींग करून शहराला पाणीपुरवठा करण्याची तयारी महापालिकेने ठेवली आहे. नियोजित वेळेत मुबलक पाऊस झाल्यास तिबार पंपींगची गरज पडणार नाही असे महापालिकेच्या सुत्रांनी सांगितले.

उपशावर हवे नियंत्रण -
बंधारा भरला की लगेच महाराष्ट्र आणि कर्नाटक हद्दीतील शेतकऱ्यांकडून पाण्याचा उपसा सुरु होतो. पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून महाराष्ट्र हद्दीतील नदीकाठच्या वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केला जातो. कर्नाटक हद्दीत मात्र चोवीस तास वीजपुरवठा सुरु असतो. त्यामुळे त्या परिसरातून होणाऱ्या उपशावर नियंत्रण ठेवले तर, पाण्याचा साठा झपाट्याने कमी होणार नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com