पाणीदार गावे करण्यात ‘सकाळ’चे योगदान

केळघर - सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने वेण्णा नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ करताना अर्चना रांजणे. त्या वेळी राजेश सोळसकर, राजेश निंबाळकर, कांताताई सुतार, बजरंग पार्टे, पूनम बेलोशे, राजेंद्र धनावडे, बबनराव बेलोशे, चंद्रकांत बेलोशे, तनिष्का सदस्या आदी.
केळघर - सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने वेण्णा नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ करताना अर्चना रांजणे. त्या वेळी राजेश सोळसकर, राजेश निंबाळकर, कांताताई सुतार, बजरंग पार्टे, पूनम बेलोशे, राजेंद्र धनावडे, बबनराव बेलोशे, चंद्रकांत बेलोशे, तनिष्का सदस्या आदी.

केळघर - जावळी तालुक्‍यात सध्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असताना टंचाईग्रस्त गावांना जलसंधारणाच्या माध्यमातून पाणीदार गावे करण्याचे मोलाचे काम सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने करण्यात येत आहे. जावळीतील प्रमुख व बाजारपेठेचे गाव असलेल्या केळघरला सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून वेण्णा नदीतील पाण्यातील गाळ काढण्यासाठी व नदीचे पात्र खोलीकरण-रुंदीकरणासाठी निधी उपलब्ध झाल्याने केळघरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे यांनी व्यक्त केला.

तनिष्का व्यासपीठाच्या सहकार्याने सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने येथील वेण्णा नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा व नदीपात्र खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी ‘सकाळ’चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, पंचायत समिती सदस्या कांताताई सुतार, सरपंच रवींद्र सल्लक, उपसरपंच बजरंग पार्टे, ग्रामपंचायत सदस्या पूनम बेलोशे, उद्योजक राजेंद्र धनावडे, माजी सरपंच बबनराव बेलोशे, चंद्रकांत बेलोशे, नांदगणेचे माजी सरपंच संजय दळवी, खादी ग्रामोद्योगचे संचालक अंकुश बेलोशे, नारायण बेलोशे, बाळासाहेब शिर्के, बाजीराव बेलोशे, तनिष्का गटप्रमुख सुवर्णा पार्टे, सुवर्णा बेलोशे, सुप्रिया पार्टे, मीनाक्षी गाडवे, सिंधू शिर्के, दीपक मोरे, संदीप बेलोशे, दत्ता बेलोशे, अशोक बेलोशे, संपत बेलोशे, आनंदा भिलारे, मनोहर शिर्के, तनिष्का, अंगणवाडी सेविका यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी श्री. सोळसकर यांनी ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांची माहिती दिली. श्री. निंबाळकर म्हणाले, ‘‘केळघर हे गाव बाजारपेठेचे गाव असून, गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत.

जलसंधारणासाठी व पाणाटंचाईवर मात करण्यासाठी ‘सकाळ’च्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. उद्योजक राजेंद्र धनावडे यांनी गावासाठी सकाळ रिलीफ फंडातून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार मानले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. तनिष्का व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण यांनी स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com