तिसंगी तलावात पाणी सोडणे बंद

tisangi
tisangi

तिसंगी - तिसंगी तलावात पाणी सोडण्याबाबत गणपराव देशमुख यांनी केलेल्या आंदोलनात नंतर पाणी सोडले होते. परंतु, आंदोलनाचा धुरळा संपताच पाणी सोडणे बंद केल्याने देशमुखांचे वजन पडले कमी असे वाटत आहे. तसेच प्रशांतराव परिचारक आणि भारत भालकेचे यांनी अधिकाऱ्यांवर टाकलेल्या दबावामुळे पंढरपुर तालुक्यातील कासेगाव अनवली परिसरात पाणी सोडण्यात आले. अधिकाऱ्यांची पाणी सोडण्याबाबतची स्टंटबाजी आंदोलनाच्या उद्रेकास कारणीभुत ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

या कालव्यातून ४०० क्युसकने पाणी सोडून तलावात व पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याला देण्याच्या चर्चा झाली होती. तलावात सध्या वजा ५ टक्के पाणीसाठा असून, पाणी न आल्यास चार हेक्टर वरील पिके धोक्यात येण्याची तसेच ११ गावांची पाणी पुरवठा योजना बंद पडण्याची शक्यता आहे. निश्चित केलेले पाणी सोडण्यास अधिकारी पेचात पडलेचे दिसत आहे.
          
तिसंगी सोनके तलावात पाणी सोडणेसाठी इनलेट नाला येथे संजय कारंडे, अशोक पवार, माजी सरपंच विजय पवार आंदोलन केले होते. आमदार गणपतराव देशमुख व दीपक आबा साळुंखे यांच्यामुळे आंदोलनाला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत होते. पण अखेर अधिकाऱ्यांनी तिसंगी तलावात सोडलेले पाणी बंद केले. यावरून या आंदोलनास अपयश आलेचे दिसुन येते. 
कालवा सल्लागार समितीची बैठक ३० तारखेस होणार होती. बैठक झाली नसल्याने तलावात पाणी सोडणेचे बंद केल्याचे अधिकारी सांगतात. तर दुसरीकडे मताच्या राजकारणासाठी पाण्याची पळवापळवी होत असल्याचे दिसुन येते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com