मंगळवेढ्यात पाणी योजनेकडूनच पाण्याचा अपव्यय 

Water wastage from the water plant in mangalvedha
Water wastage from the water plant in mangalvedha

मंगळवेढा : दक्षिण भागातील 39 गावांसाठी यंदाच्या दुष्काळात लाभदायक ठरणाऱ्या भोसे प्रादेशिक पाणी योजनेस वारंवार गळती आणि टाक्या ओव्हरपूल होत आहेत. वापरापेक्षा अधिक पाणी वाया जात असल्याने या कार्यालयाने ही योजना दुष्काळात चांगली चालवण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन आघाडी सरकारने भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर केली. आ. भारत भालके यांनी यासाठी असलेली लोकवर्गणीची अट रद्द करण्यासाठी पाठपुरावा करून रद्द केली. त्यामुळे तालुक्याच्या दक्षिण भागातील 39 गावांना या योजनेचे पाणी मिळत आहे.

भीमा नदीच्या उचेठाणा बंधाऱ्यातून हे पाणी जुनोनीन्या जलशुद्धीकरण केंद्रात टाकले जात असून हे पाणी चार वेगवेळ्या झोनमधून हे पाणी 39 गावातील जनतेला दिले जात आहे. पण या पाण्याच्या लाभापासून वाडी वस्तीवरील लोक मात्र वंचित आहे. त्याची तर भटकंती सुरूच आहे. या योजनेमुळे या गावाना टँकर मिळण्याची शाश्वती नसल्याने उपलब्ध पाणी बचत करून वापरणे आवश्यक आहे.

यंदा नेहमीपेक्षा भीषण दुष्काळ असून पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होणार असली तरी या योजनेचा लाभ या गावाला होणार आहे. सध्या उजनी धरणातील पाणीसाठा कमी होत असताना राहिलेल्या चार महिन्यांमध्ये पाणी काटकसर आणि बचत करून वापरावे लागणार आहे. पाणी बचतीचा सल्ला या भागातील जनतेला ग्रामपंचायतीकडून दिला जात असला तरी बहुतांश ग्रामपंचायतीच्या टाक्या ओव्हरपूल होवून पाणी हे वाया जात असल्याचे पाहणीत दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com