आरं, मला शाळंत येऊ द्या की रं... 

Well, let me come to school ...
Well, let me come to school ...

टाकळी ढोकेश्वर : सर्वांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण यासाठी शासनस्तरावरून विविध कायदे करून शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या वाटेवर आणले जात आहे. मात्र, दुसरीकडे तांत्रिक कारणामुळे आदिवासीविद्यार्थी पुन्हा शालाबाह्य होत आहेत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला पुन्हा भटके जीवन येते. ढवळपुरीचे हंगामी वसतिगृह बंद पडल्याने ही स्थिती ओढावली आहे. हे भटके विद्यार्थी व त्यांचे पालक "आम्हाला शाळंत येऊ द्या...' असे आर्जव करीत आहेत. 

एकही हंगामी वसतिगृह नाही 
पारनेर तालुक्‍याचा विचार केला तर या तालुक्‍यात भटके-जीवन जगणारे व दुर्गम आदिवासी भागातील अनेक कुटुंबे मेंढपाळ, ऊसतोडीसाठी भटकंती करतात. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. हंगामी स्वरुपात भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांसाठी राज्य शासनाने हंगामी वसतिगृह, साखरशाळा अशा योजना तयार केल्या आहेत, मात्र, पारनेर तालुक्‍यातून मोठ्या संख्येने स्थलांतर होते. मात्र, तालुक्‍यात एकही हंगामी वसतिगृह नाही. परिणामी आदिवासी, भटके विमुक्त समाजातील अनेक विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित राहतात. 

आश्रमशाळेत मर्यादित प्रवेश 
पारनेर तालुक्‍याच्या उत्तरेकडील ढवळपुरी व परिसरातील अति दुर्गम व आदिवासी भागातील शेकडो मेंढपाळ आज आपल्या मेंढ्यांना घेऊन नाशिक, मावळ, कोकण विभागात भटकंती करतात. त्याच्या मुलांसाठी ढवळपुरी येथे आश्रमशाळेत निवासी प्रवेश मर्यादित असल्याने स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या मुलांना प्रवेश मिळत नाही. 

हंगामी वसतिगृह बंद झाले 
म्हणून तेथे या विद्यार्थ्यांसाठी हंगामी वसतिगृहाची सुविधा होती. मात्र मागील वर्षापासून शासनाच्या आदेशावरून हे हंगामी वसतिगृह बंद झाले.परिणामी तेथे शिक्षण घेणारे भटके विद्यार्थी पुन्हान शालाबाह्य होत आहे. ही मुले ऊसतोड करताना, मेंढ्या चारताना दिसत आहेत. तालुक्‍यातील शाळाबाह्य मुलांचा वाढता आकडा मोठा आहे. ही स्थिती बदलली नाही तर ही भटकी मुले अक्षरशत्रूच राहतील. 

वसतिगृहात राहुन शिक्षण घेतले 
मी मेंढपाळ समाजातील आहे. माझ्यासारख्या अनेक भटक्‍या विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ढवळपुरी येथील हंगामी वसतिगृहात राहून झाले. आज मी त्यामुळेच उच्च शिक्षण घेत आहे. 
- संतोष गोयेकर, हंगामी वसतिगृहातील माजी विद्यार्थी. 

वसतिगृहाची गरज 
आम्ही मेंढपाळ आहोत. आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृहाची सोय आवश्‍यक आहे. त्यासाठी शासनाने योग्य ती कार्यवाही केली पाहिजे. 
- दत्ता नाथा कऱ्हे, पालक. 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com