Video : बँडमालक, वादकांवर अतिशय वाईट वेळ; पोटासाठी करावं लागतंय हे काम 

Video : बँडमालक, वादकांवर अतिशय वाईट वेळ; पोटासाठी करावं लागतंय हे काम 

पिंपरी : कोरोनाच्या संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये लग्नसराई, समारंभ बंद आहेत. त्यामुळे बॅन्ड व्यावसायिकांवर संक्रात आली आहे. सध्या या बॅन्डमध्ये वादक म्हणून काम करणाऱ्या वादकांवर बिगारी काम करण्याची, तर काही बॅन्ड मालकांनी फळ आणि भाज्यांची विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. सध्या निर्माण झालेली स्थिती दिवाळीपर्यंत आटोक्‍यात येण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे आता सुरू असणारे कामच आणखी काही काळ करावे लागणार असल्याची भावना बॅन्ड व्यावसायिकांनी व्यक्‍त केली. 

वादकांवर आलीय ही वेळ

बॅन्डमध्ये सिंथेसायझर, क्‍लोरोनेट, ऑर्गन वाजवणारे कलाकार असतात. त्यांची कला कशी आहे, ते पाहून त्यांना पैसे दिले जातात. तीनशे रुपयांपासून ही रक्‍कम एक हजार रुपयांपर्यंत असते. लग्नसराईच्या मोसमात त्यांना चार ते पाच तास काम असते. मात्र, आता कोरोनामुळे बॅन्ड बंद असल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक वादक बिगारी, तर काही जण गवंड्याच्या हाताखाली काम करीत आहेत. आठ तासांच्या कामासाठी त्यांना 300 ते 400 रुपयांची हजेरी मिळत आहे. शहरात काम करणाऱ्या वादकांपैकी काही जण जालना, बुलडाणा, नगर, जामखेड, करमाळा या भागातील होते. त्यांना देखील छोट्या मोठ्या कामांचा आधार घ्यावा लागत आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बॅन्डमालक म्हणतात... 

लॉकडाउनपासून लग्नसराई, समारंभ पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे बॅन्डमालक पूर्णपणे तोट्यात आहेत. खिशातच पैसे नसल्यामुळे बॅन्डसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांची तीन महिन्यांपासून देखभाल झालेली नाही. लॉकडाउन शिथिल होत असला, तरी समारंभांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे संसार चालवायचा कसा, असा प्रश्‍न पडला असल्याची कैफियत भीमराव पवार या बॅंन्डमालकानने मांडली. मुले नोकरी करतात. त्यामुळे घर चालू आहे. मात्र, सध्याची परिस्थिती आणखी काही काळ अशीच राहिली, तरी मला देखील एखाद्या कंपनीमध्ये बिगारी म्हणून काम करायला जावे लागेल, असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, लॉकडाउन लागल्यानंतर बॅन्ड बंद झाले आहेत. त्यामुळे घर चालवण्यासाठी सध्या यमुनानगर परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे भानुदास खाडे या बॅन्ड चालकांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गेल्या वर्षीच्या ऑक्‍टोबर महिन्यात बॅन्डसाठी नवीन कपडे, बूट, टोप्या खरेदी केल्या होत्या. त्यासाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, यंदा कोरोनामुळे मार्च ते आतापर्यंतच्या कालावधीत लग्नसराईचे मोठे समारंभ झाले नाहीत. त्यामुळे या कपड्यांच्या घड्या देखील मोडलेल्या नाहीत. त्यामुळे व्यवसायाचे काय होणार, याची चिंता सतावू लागल्याचे खाडे यावेळी म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com