पिंपरी - दोन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या लॉकडाउनमुळे विस्कळीत झालेल्या अर्थचक्राने अनेकांवर नोकरी गमावण्याचे संकट ओढावले आहे. आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अचानक नोकरी जाणे, पगार कपात, कायम असुरक्षिततेची भावना अशा कारणांमुळे ‘आयटीयन्स’ना चिंतारोगाची समस्या सतावू लागली आहे. पूर्वी चार टक्क्यांपर्यंत असणारे हे प्रमाण लॉकडाउनच्या काळात १५ टक्क्यांपर्यंत पोचले आहे.
अशी आहे सद्यःस्थिती
सध्या ‘आयटीयन्स’ना कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमसारखी सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी त्यांना रोजच्या जीवनात कधीही न येणाऱ्या ताणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकेवर होत आहे.
‘सोशल मीडिया’वरून मार्गदर्शन
नोकरी गेल्यानंतर मनावरील ताण कमी करण्यासाठी आयटीयन्सना व्हिडिओंच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा उपक्रम संघटनांकडून सुरू करण्यात आला आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडून ‘सोशल मीडिया’द्वारे मार्गदर्शक संवाद साधण्यात येत आहे, असे राज्य सरकारच्या आयटी समितीचे सदस्य पवनजित माने यांनी सांगितले.
निद्रानाश, नैराश्य
मानसिक स्वास्थ्य स्थिर ठेवण्यासाठी
वयोगटानुसार चिंताग्रस्त
३०-४० वयोगट - 10%
४०-५० वयोगट - 15%
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.