RTE
RTESakal

आरटीई प्रक्रिया अद्यापही काही जिल्हयात ‘लॉक’

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षणांतर्गत राबविण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया अद्याप पुणे जिल्ह्यात सुरू झालेली नाही.
Summary

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षणांतर्गत राबविण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया अद्याप पुणे जिल्ह्यात सुरू झालेली नाही.

पिंपरी - बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) (RTE) कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षणांतर्गत (Reservation) राबविण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया (Admission Process) अद्याप पुणे जिल्ह्यात (Pune District) सुरू झालेली नाही. गुरुवारी (ता. १७) गोंदिया पाठोपाठ इतर १६ जिल्ह्यांत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुणे जिल्‍ह्यात अद्याप माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. परिणामी, दोन दिवसांपासून सिस्टिम ‘लॉक’ (Lock) आहे. त्यामुळे पालकांची गैरसोय कायम आहे.

आरटीई कायद्यांतर्गत दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांचा खासगी शाळांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होते. त्यामुळे या आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची वाट अनेक पालक आतुरतेने पाहत आहेत. सलग दोन दिवसांपासून पालक अर्ज करण्यासाठी सुट्ट्यांवर आहेत. पण सिस्टिम बंद आहे. दरम्‍यान, आरटीईत २५ टक्के प्रवेशाचे २०२२-२३ या वर्षासाठीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने २३ डिसेंबरलाच जाहीर केले. त्यानुसार त्यानुसार २५ जानेवारीपासून शाळांच्या नोंदणीला सुरवात झाली. याआधी एक फेब्रुवारीपासून पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापी काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करता आली नव्हती. त्याऐवजी आता १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरता येईल, असे सांगण्यात आले होते.

RTE
पिंपरी : इंदिरा गांधी रेल्वे पुलावरून शगुन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद

मात्र, त्यापूर्वी गोंदियामध्ये १६ फेब्रुवारीपासून दुपारी तीनपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये १७ तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात कही जिल्हे वगळता सुरुवातच झालेली नाही. परंतु अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने प्रवेशासाठी अर्ज करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशप्रक्रिया ३० सप्टेंबरपूर्वी राबविण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिल्या होत्या. मात्र, आरटीई अर्ज नोंदणीलाच उशीर झाल्यानंतर इतर प्रक्रिया वेळेत कशी पूर्ण करणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

या १६ जिल्ह्यात प्रक्रियेला सुरुवात

दरम्यान १६ फेब्रुवारीला ३५ जिल्ह्यांपैकी गोंदिया वगळता कोणत्याही जिल्ह्यात प्रक्रिया सुरू झाली नाही. १७ तारखेला दुपारी तीननंतर सुरू होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने पोर्टलवर प्रसिद्ध केली होती. मात्र, गुरुवारी फक्त १५ जिल्ह्यात प्रक्रिया राबविण्यास सुरू झाली आहे. त्यामध्ये अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, भंडार, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, रत्नागिरी, सांगवी, सिंधूदुर्ग, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित कधी सुरू होतील, साशंकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com