पवना धरणातील जलसाठा
ऑगस्टपर्यंत पुरेल ः सिंह

पवना धरणातील जलसाठा ऑगस्टपर्यंत पुरेल ः सिंह

पिंपरी, ता. २८ ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र, एल निनोच्या प्रभावामुळे आगामी पावसाळ्यात सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत आराखडा तयार करण्याची सूचना महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन सिंह यांच्या अध्यक्षतेखालील पाणीपुरवठा विभागाची विशेष बैठक झाली. त्यास सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, अजय सूर्यवंशी, डी. डी. पाटील आदी उपस्थित होते. सद्यःस्थितीत दिवसाआड प्रतिदिन ५७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, आगामी काळात पाऊस कमी झाल्यास ऑक्टोबर अखेरपर्यंत पवना धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेतला जाणार आहे. त्याअनुषंगाने जून २०२४ अखेरपर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, यावर बैठकीत चर्चा झाली.

असे होणार नियोजन
महापालिकेच्या व खाजगी बोअरवेल सर्वेक्षण आणि त्यांची दुरुस्ती करणे, आवश्यकतेनुसार बोअर व विहिरी अधिग्रहण करण्याबाबत माहिती संकलित करणे, पाणीकपात धोरण निश्चित करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करणे, पाणी गळती टाळण्यासाठी विविध उपाययोजना करणे.

आंद्राचे पाणी मिळेल
आंद्रा धरणातून निघोजे येथे १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन अशुद्ध जलउपसा करून चिखली जलशुद्धीकरण केंद्रामधून पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे सुमारे १०० दशलक्ष लिटर पाणीतूट भरून काढता येईल. भामा-आसखेड धरणातून १६५ दशलक्ष लिटर पाणी घेण्यासाठीच्या प्रकल्प गतिमान करण्यावर दिला जाणार आहे.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com