

Naseeruddin Shah
ESakal
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका वृत्तपत्रातील लेखात शाह म्हणाले की, मुंबई विद्यापीठाने त्यांचे निमंत्रण रद्द करणे हे त्यांच्या नैतिक सचोटी आणि धाडसाचे प्रतीक आहे. प्रशंसा न करणे आता देशद्रोह बनले आहे. हा आता तो देश राहिला नाही जिथे मी वाढलो आणि प्रेम करायला शिकवले गेले. 'दोन मिनिटांचा द्वेष' आता २४ तासांचा द्वेष बनला आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.