

apurva nemlekar
ESAKAL
छोट्या पडद्यावरची सगळ्यात जास्त गाजणाऱ्या मालिकांमधील एक म्हणजे 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. यातील सगळीच पात्र गाजली. मात्र सर्वाधिक गाजली ती शेवंता आणि अण्णा नाईकांची जोडी. मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने शेवंताची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली. मात्र तिसऱ्या भागात अपूर्वाने अचानक मालिकेतून एक्झिट घेतली होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अपूर्वाने तेव्हा नेमकं काय घडलेलं याबद्दल सांगितलंय.