

Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामींच्या कृपेने आणि सूचक लीलांमधून गोमतीच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होण्याची चाहूल लागते. विधवा म्हणून आयुष्य संपल्याची भावना मनात बाळगणाऱ्या गोमतीला स्वामी विविध संकेतांमधून नव्याने जगण्याची प्रेरणा देतात. रोपट्याला पाणी घालताना किंवा महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करत असताना वेगवेगळ्या कृतींतून स्वामी तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आणि सौभाग्य येणार असे संकेत देत राहतात.