

aarya ghare on gashmeer mahajani
esakal
सध्या प्रवीण तरडे यांचा 'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरपर्यंत येण्यास भाग पाडलं. या चित्रपटाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. त्यांच्या 'देऊळबंद' या चित्रपटालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी याने मुख्य भूमिका साकारली होती. तर अभिनेते मोहन जोशी यांनी स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गश्मीरची ऑनस्क्रीन लेक त्याच्याशी चार दिवस बोलत नव्हती. आता एका मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलंय.