
Marathi Entertainment News : स्टार प्रवाह वाहिनीवरील सगळ्याच मालिका लोकप्रिय आहेत. त्यातीलच सध्या एक चर्चेत असलेली मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम. काव्या, जीवा, नंदिनी आणि पार्थ यांची गोष्ट असलेली मालिका अल्पावधीत प्रेक्षकांना पसंत पडू लागली आहे. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यातच आता काव्या महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे.