
छोट्या पडद्यावर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. मात्र त्यासाठी एक जुनी मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतलाय. ही मालिका म्हणजे 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका होती. कधीकाळी टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेतील सागर मुक्ताची जोडी प्रेक्षकांची आवडती होती. सुरुवातीला या मालिकेत राज हंचनाळे आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत होते. मात्र कालांतराने तेजश्रीने मालिका सोडली आणि सगळं चित्र बदललं. आता अखेर ही मालिका बंद होणार आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्याने स्क्रिप्टचा फोटो शेअर केला आहे.