Aakhri Sawal Review: गांधीजींची हत्या ते बाबरी पतन; कसा आहे संजय दत्तचा 'आखरी सवाल'? वाचा रिव्ह्यू!

Aakhari Sawal Movie Review: आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच ‘आरएसएस' या नावाभोवती खूप चर्चा झालेली आहे आणि काही वादही निर्माण झालेले आहेत. आता या चित्रपटामध्ये दिग्दर्शकाने नेमक्या याच गोष्टीवर भाष्य केले आहे.
aakhari sawal

aakhari sawal

esakal

Updated on

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काही चित्रपट असे असतात की ते फारसा गाजावाजा न करता प्रदर्शित होत असतात. 'आखरी सवाल' हा त्यापैकीच एक चित्रपट. अभिनेता संजय दत्त, समीरा रेड्डी, नमाशी चक्रवर्ती. अमित साद, नीतू चंद्रा आदी कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजित मोहन वारंग यांनी केले आहे. या चित्रपटाचे कथानक गुरू-शिष्य यांच्यातील तीव्र संघर्षावर बेतलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि त्याने गेल्या शतकभर केलेले कार्य यांच्या भोवती ही कथा फिरणारी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com