

THARLA TAR MAG LATEST TWIST
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मालिकेत सध्या सायलीला तिचा भूतकाळ आठवल्याचं दाखवण्यात आलंय. सायलीला जुन्या सगळ्या गोष्टी आठवल्याने तीच खरी तन्वी आहे हे तिला समजलंय. त्यानंतर ती या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी मधुभाऊंना भेटायला जाते. यावेळेस मधुभाऊ देखील तिला इशारा करत तिच्या मनातली शंका खरी असल्याचं सांगतात. म्हणजेच तीच खरी तन्वी आहे हे सांगतात. मात्र आता मालिकेत नवीन ट्विस्ट आलाय. प्रियाची जेलमधून सुटका झालीये.