

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'ने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलंय. मालिकेतील सायली आणि अर्जुन यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. आता मालिकेत सध्या वेगळाच ट्विस्ट आलाय. मालिकेत सायलीला घराबाहेर काढल्यानंतर पूर्णा आई आणि कल्पना मिळून त्याचं लग्न प्रियाशी लावून देत आहेत. मात्र दुसरीकडे अर्जुनचं लग्न आपल्याशीच होणार असं सायलीचं म्हणणं आहे. त्यामुळे हे नक्की कसं घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. आता मालिकेच्या कलाकारांनीच याबद्दल महिती दिली आहे.