

vinod khanna
ESAKAL
एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करत असलेले रुबाबदार, देखणे व्यक्तिमत्व लोकप्रिय नायक विनोद खन्ना कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत राहिले. केवळ चित्रपटच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही प्रचंड चर्चा झाली. त्यांनी यशाच्या शिखरावर असताना बॉलिवूड सोडलं. १९८२ मध्ये त्यांनी बॉलिवूड सोडलं आणि संन्यासी बनले. मात्र यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. इतकी लोकप्रियता सोडून सहज निघून जाणं सोपं नव्हतं. मग असं अचानक काय घडलं ज्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला याबद्दल विनोद यांची दुसरी पत्नी कविता यांनी भाष्य केलंय.