

Marathi Entertainment News : अनेक उत्तम सिनेमांचे संवाद लिहिणारे, उत्तम गाणी लिहिणारे लेखक, पटकथा लेखक आणि गीतकार म्हणजे जावेद अख्तर. जावेद यांनी शोले, मशाल, जंजीर अशा अनेक सिनेमांचं लेखन सलीम खान यांच्याबरोबर केलं आहे. जावेद यांनी अनेकदा त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दल भाष्य केलं आहे. पण पहिल्यांदाच त्यांनी त्यांच्या पहिल्या लग्नावर भाष्य केलं.