Premium| Bacchu Kadu: महाराष्ट्रातील पहिली काँग्रेस-शिवसेना युती चांदूर बाजारमध्ये कशी झाली?

1997 Panchayat Samiti Election: माझ्यासाठी १९९७ ची पंचायत समिती निवडणूक महत्त्वाची ठरली. ती फक्त निवडणूक नव्हती, तर आयुष्याला वेगळं वळण देणारी गोष्ट होती.
Bacchu Kadu 1997 election

Bacchu Kadu 1997 election

esakal

Updated on

बच्चू कडू

Bacchuprahar41@gmail.com

पंचायत समितीचं पाच वर्षांचं काम संपताना मी एक धडा शिकलो. राजकारण म्हणजे खेळ नाही. ते जबाबदारीचं रणांगण आहे. माझ्यासाठी १९९७ची पंचायत समितीची निवडणूक महत्त्वाची होती. ती फक्त निवडणूक नव्हती, तर माझ्या आयुष्याची वळण घेणारी गोष्ट ठरली.

त्रांनो, काही प्रसंग असे असतात, की ते घडल्यानंतर माणूस जसा होता तसाच राहत नाही. माझ्यासाठी १९९७ची पंचायत समितीची निवडणूक तशीच होती. ती फक्त निवडणूक नव्हती, तर माझ्या आयुष्याची वळण घेणारी गोष्ट होती. तेव्हा चांदूर बाजार पंचायत समितीचे सभापती होते स्व. नानासाहेब देशमुख आणि उपसभापती स्व. बाबूराव जवंजाळ. त्यांचा कार्यकाळ संपला आणि नवीन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्या वेळी महाराष्ट्रभर शिवसेना-भाजप युतीचा गजर होता आणि मी शिवसेनेचा तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत होतो. माझं संघटन तयार होतं, लोकांशी नाळ जुळली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com