Davos 2026 Maharashtra investment analysis
esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium|Davos 2026 : आर्थिक परिवर्तनाचे दावोस
Davos 2026 Maharashtra investment analysis : दावोस २०२६ परिषदेत महाराष्ट्र व भारताने विक्रमी गुंतवणूक सामंजस्य करार केले. मात्र प्रत्यक्ष उद्योग, रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि पारदर्शक अंमलबजावणी झाली, तरच दावोस भारताच्या दीर्घकालीन आर्थिक परिवर्तनाचे साधन ठरेल, असे डॉ. अनंत सरदेशमुख यांनी नमूद केले.
डॉ. अनंत सरदेशमुख
माजी महासंचालक, सदस्य, कार्यकारी समिती, मराठा चेंबर, कंपनी संचालक, व्यवस्थापन स्टार्टअप मार्गदर्शक
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ हे दावोस येथील व्यासपीठ गेल्या दोन दशकांत विचारमंथनापुरते मर्यादित राहिले नाही. हे व्यासपीठ म्हणजे जागतिक गुंतवणूक, धोरणात्मक भागीदारी आणि आर्थिक शक्तिप्रदर्शनाचे केंद्र बनले आहे. भारताने नुकत्याच झालेल्या परिषदेमध्ये आतापर्यंतची सर्वांत मोठी उपस्थिती लावली. भारताने विशेषतः महाराष्ट्राने आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जास्त विचार केल्याचे दिसून येते. सामंजस्य करार झाले असले, तरी ते करार प्रत्यक्षात येताना उत्पादन प्रक्रियेपर्यंतचा प्रवास लवकरात लवकर पूर्ण व्हावा. तसे झाले, तर दावोस भारताच्या दीर्घकालीन आर्थिक परिवर्तनाचे खरे साधन ठरेल.

