

India Census After 16 Years: What Changes and Why It Matters
E sakal
Census 2026: Why Self-Enumeration Could Change India’s Data Game
डॉ. अजित कानिटकर, आर्थिक-सामाजिक विकासप्रक्रियेचे अभ्यासक
देशभरात सर्व नागरिकांची मोजणी करण्याचा उत्सव येत्या काही महिन्यात सुरू होणार आहे. यापूर्वीची सर्व लोकसंख्येची गणना २०११ मध्ये झाली होती. २०२१मध्ये म्हणजे दर दहा वर्षांनी ही गणना होणे अपेक्षित होते. पण कोरोनाच्या २०१९मधील प्रादुर्भावामुळे २०२१ मध्ये ही मोजणी होऊ शकली नाही. आता जवळपास १५-१६ वर्षांनी आपल्या देशातील सर्व नागरिकांबद्दल सविस्तर, एकत्र माहिती मिळवण्याचे काम आता देशभर सुरू झाले आहे. २०२६ मध्ये हे काम संपून २०२७ मध्ये त्याबद्दल पूर्ण आकडेवारी उपलब्ध होणार आहे.