

India US trade relations
esakal
कल्याणी शंकर
अखेर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादले. त्यामुळे उभय देशांच्या संबंधांत तणाव निर्माण झाला आहे. या मोठ्या आयातशुल्कामुळे भारताची अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते. तरीही व्यापारयुद्धाची भीती सध्या कमी आहे.
भारताने अमेरिकन वस्तूंवर आयात शुल्कवाढ केलेली नाही. उलट अमेरिकेच्या वाढीव आयातशुल्काचा परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. वस्तु व सेवा कराचा (जीएसटी) दर कमी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला आहे. तसेच नवीन निर्यात बाजारपेठा शोधण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे.