US-India Trade Deal
Esakal
पुणे - “अमेरिका ही भारताविषयीचे सर्व निर्णय घेत आहे. सरकारने देशाला विकून टाकलं आहे. इंजिनियर्स विकले गेलेत, शेतकरी विकले गेलेत आणि भारताचा डेटा देखील विकला गेला आहे. हे ट्रेड डील नसून सरेंडर डील आहे” असा गंभीर आरोप काल भारत-अमेरिका व्यापार कराराविषयी संसदेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
भारत अमेरिकेसोबत करत असलेल्या व्यापार करारावर शेतकऱ्यांनी देखील देशव्यापी संपाची हाक दिली आहे. एकीकडे नुकतीच युरोपियन युनियनसोबत भारताने केलेल्या कराराची घोषणा झाली. या कराराचे सर्व स्तरातून स्वागत झाले. मात्र भारताने अमेरिकेसोबत केलेल्या कराराला चांगलाच विरोध सुरू झाला आहे.
पण या कराराला शेतकऱ्यांचा इतका मोठ्या प्रमाणात विरोध का होतोय, हा करार शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान करून अमेरिकन शेतकऱ्यांसाठी पायघड्या घालतोय का, विरोधी पक्षातील लोकं अमेरिकाच सगळ्या गोष्टी ठरवते असा आरोप का करत आहेत आणि या सगळ्यावर सरकारचं काय म्हणणं आहे हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ या विशेष लेखातून.