सुहास राजदेरकर:-
आता मे महिना आहे आणि बहुतेक लोक आंब्यांवर ताव मारत असतील, कारण हे फळच असे रसाळ आणि मधुर आहे, की आपण त्याची फेब्रुवारीपासूनच आतुरतेने वाट पहायला लागतो. आंब्याचा त्या पलीकडे जाऊन बारकाईने अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येईल, की आंबा हे फळ आपल्याला गुंतवणुकीविषयी काही मूलभूत आणि महत्त्वाचे धडे देते. कसे ते थोडक्यात पाहू या.