Premium|Study Room : मुझफ्फरपूर कट प्रकरणाने भारतीय क्रांतिकारी चळवळीला दिले नवे ऐतिहासिक वळण

Indian Revolutionary Movement : मुझफ्फरपूर कट प्रकरणाने भारतीय क्रांतिकारी राष्ट्रवादाला नवी दिशा दिली. बंगाल फाळणीनंतर सशस्त्र स्वातंत्र्यलढ्याची भावना बळावली आणि ब्रिटिशांविरोधातील संघर्ष अधिक तीव्र झाला.
Indian Revolutionary Movement

Indian Revolutionary Movement

esakal

Updated on

लेखक : विपुल वाघमोडे

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात काही घटना अशा आहेत की ज्यांनी केवळ तत्कालीन राजकीय परिस्थितीवर परिणाम केला नाही, तर संपूर्ण राष्ट्रीय चळवळीची दिशा बदलून टाकली. ३० एप्रिल १९०८ रोजी घडलेले मुझफ्फरपूर कट प्रकरण (Muzaffarpur Conspiracy Case) हे त्यापैकीच एक महत्त्वाचे प्रकरण मानले जाते. बंगालच्या फाळणीनंतर भारतीय राजकारणात निर्माण झालेल्या असंतोषाच्या वातावरणातून जन्माला आलेली ही घटना भारतीय क्रांतिकारी राष्ट्रवादाच्या इतिहासातील एक निर्णायक वळण ठरली.

१९०५ मध्ये तत्कालीन व्हाइसरॉयने बंगालची फाळणी केली. बंगालमध्ये स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळी उभ्या राहिल्या. या चळवळींच्या पार्श्वभूमीवर काही तरुणांना असे वाटू लागले की केवळ सभांमधून आणि निवेदनांमधून स्वातंत्र्य मिळणार नाही. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र संघर्ष हाच एकमेव मार्ग आहे, अशी भावना वाढू लागली. याच काळात अनुशीलन समिती आणि युगांतरसारख्या गुप्त क्रांतिकारी संघटना सक्रिय झाल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com