

उज्ज्वलकुमार
उत्तर भारतातील सगळ्या राज्यात सत्तेवर येऊन आपला मुख्यमंत्री या पक्षाने पाहिला. पण बिहारमध्ये ते शक्य झाले नव्हते. यावर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणूक जिंकून आपला मुख्यमंत्री बघण्याची भाजपला घाई झाली आहे. भाजपने बिहारमध्ये ‘सौगात ए मोदी’ सारख्या विविध उपक्रम-प्रयोगांची पेरणी आतापासूनच सुरू केली आहे. प्रमुख विरोधक लालूंच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला पराभूत करण्यासोबतच सहकारी मित्र पक्ष असलेल्या संयुक्त जनता दल व नितीशकुमार यांनाही रोखण्यासाठीचे अंतर्गत प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी केंद्रीय सत्तेचा वापरही सुरू झाला आहे. त्यामुळे निवडणुकीआधी अनेक छोटी-मोठी वादळे आताच अनुभवायला मिळणार आहेत.