पुणे : आम्ही कायम आमच्या पूर्वजांकडून ऐकतो की, तुम्हाला सगळं आयतं मिळालं आहे. आमच्या काही आम्ही काय प्रकारचा संघर्ष केलाय. लांबलांब पर्यंत शाळेत चालत गेलो, नवीन कपडे सणावाराला घ्यायचो... अशी वाक्य जरी ऐकायला आली तरी मी ते चेष्टेच्या सुरात घ्यायला सुरुवात करतो. त्यांच्यावेळी वेगळी आव्हानं होती.
आता आमची परिस्थिती वेगळी आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सगळं जग उपलब्ध आहे पण कुठे जायचंय तेच कळत नाही, खूप मित्र आहेत पण जवळचं कोणीच नाही, सेटल व्हायचा प्रयत्न करतोय पण धड नोकरी नाही, जी आहे तिची शाश्वती नसल्याचे २५ वर्षांचा आदित्य (नाव बदलले आहे) सांगतो.