मुंबईच्या सर्व किल्ल्यांची सफर करणे हा अतिशय वेगळा अनुभव आहे. करोडो लोकांच्या या मायानगरीतील हे किल्ले बघणे हा एक वेगळा आनंद आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची सर या किल्ल्यांना नाही; पण मानवाच्या अविरत विकासकामांच्या धांगडधिंग्यातही इतिहासाच्या या खुणा आज जिवंत आहेत, हेही नसे थोडके!